Sunday 24 April 2022

'अनाहिलेशन ऑफ कास्ट'

'अनाहिलेशन ऑफ कास्ट'आधुनिक भारतातील जातनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचापाया ज्या पुस्तकाने रचला ते पुस्तक म्हणजे दि अॅनहिलेशन ऑफ कास्ट...आजपासून सुमारे ८० वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अॅनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक प्रकाशित झाले. खरं तर या पुस्तकाने प्रकाशनापूर्वीचभारतातील सामाजिक आणि धार्मिक राजकारणात प्रचंडखळबळ माजवली होती. परंतू त्याच्या प्रकाशनाच्या आज ८० वर्षांनंतरही या पुस्तकानं केलेलं क्रांतिकारक कार्य आपल्या अनुभवाला येत आहे.हे पुस्तक खरे तर एक भाषण आहे. १९३५ साली लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक आधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करावयाचे अध्यक्षीय भाषण आयोजकांना आधिवेशनाआधीच पाठवून दिले होते. ते भाषण इतके टोकदार होते की आयोजकांना ते पचनी पाडताच आले नाही. त्यांनी घाबरून तो कार्यक्रमच रद्द करून टाकला. आणि ते भाषण झालेच नाही. त्यावेळी देशभरात प्रचंड मोठा वाद या निमित्ताने घडूनआला. गांधीजीसोबत अनेक दिग्गज नेत्यांनी या झाल्या प्रकारावर टिप्पणी केली होती. मग बाबासाहेबांनी सदर भाषण जसेच्या तसे १५ मे १९३६ रोजी पुस्तक रुपात प्रसिद्ध केले. भाषणाचे नाव होते... दी अॅनहिलेशन ऑफ कास्ट...मराठीत जातिसंस्थेचे निर्मूलन या नावाने प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेची अतिशय क्रांतिकारी अशी समीक्षा केली होती.. त्यात प्रथमतःच जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे ... इतकी सरळ आणि स्पष्ट मांडणी करण्यात आली होती. त्यातबाबासाहेब म्हणतात की...."जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे. जातिविनाश म्हणजे भौतिक बंधनांचा विनाश नव्हे. जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... हिंदू जातिभेद पाळतात कारण ते बुद्धिहीन वा अमानुष आहेत म्हणून नव्हे, तर ते धर्मपरायण असल्यामुळे! याला त्यांच्या मनात जातीय वृत्ती रूजविणारा धर्म जबाबदार आहे. खरा शत्रू जातिभेदपाळणारे लोक नसून त्यांना तो धर्म पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. त्यामुळे शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांच्या श्रद्धा व मते यांची जडणघडण शास्त्रे करीत असताना आणि त्यांचा लोकांच्या मनावरील पगडा कायम असताना तुम्हाला यशाची अपेक्षा कशी करता येईल? धर्मशास्त्रप्रामाण्यास स्वत: आव्हान द्यायचे नाही, लोकांना शास्त्रांच्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा त्यांच्या वागणुकीवर व कृतींवर अमानुष, अविवेकी अशा विशेषणांनी टीका करायची, हा समाजसुधारणेचा मार्ग विपरीतच म्हटला पाहिजे. श्रीमान गांधींसकट कुणीही ही गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही की, लोकांच्या कृती म्हणजे शास्त्रांचा त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांचा परिपाक होय. त्यामुळे त्यांची वागणूक ज्या शास्त्रांवर आधारित आहे त्या शास्त्रांवरील विश्वास उडाल्यावाचून ते आपले वर्तन बदलणार नाहीत. म्हणून समाजसुधारकांचे सर्व प्रयत्न फसले यात नवल नाही... धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री-पुरुषास मुक्त करा.म्हणजे मग पहा, ते स्वत:च सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही!.... शास्त्रप्रामाण्य धुडकावण्याची भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा!"गांधीजींनी या पुस्तकाचे समीक्षण करताना हरिजन मध्ये दोन दीर्घ लेख लिहीले. आणि त्या लेखांतून डॉ. आंबेडकरांवर कसून टिका केली. डॉ. आंबेडकरांनी देखील या टिकेचे खंडन करणारे लेख लिहीले. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत बाबासाहेबांनी गांधीजींनी केलेली टिका आणि त्यांचे खंडन या दोहांचाही समावेश केला. सोबतच हे पुस्तक मराठी सोबत इतर अनेक भाषांत प्रसिद्ध केले गेले.पण या ग्रंथाचा सर्वात जास्त प्रभाव हा गांधीजीवर पहायला मिळाला. सुरूवातीच्या आयुष्यात चातुर्वण्य, जातिव्यवस्थेचे,सनातनी धर्माचे कट्टर पुरस्कर्ते असलेले गांधीजी मात्र नंतर आंतरजातीय विवाहाचे उघड उघड पुरस्कर्ते झाले. याचा दुरगामी परिणाम देशाच्या समाजकारणावर घडून आला. काँग्रेसच्या नीतींमध्ये बदल घडून आला. लोकांचा अस्पृश्यांसोबतचइतर जातींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलूलागला. जातीपातींच्या भिंतींना सुरूंग लावण्याचं काम केलं ते... अॅनहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथानं…

No comments:

Post a Comment