महाविद्यालयात बघा
मोबाईलचा फिवर आहे।
शिक्षणाच्या नावाखाली
हातात फक्त पुस्तक आहे।
महाविद्यालयीन जीवन
नुसत टाईमपास असतं।
मुलांच लक्ष मुलींवर
तर मुलींच मुलांवर असतं।
प्रार्थनेच्या वेळी फक्त
तनाने रांगेत असतात।
तोंडाने राष्ट्रगीत
तर मनाने प्रेमगीत गातात।
वर्गात शिकवण्याकडे
लक्ष काही लागत नाही।
मँडमच्या मोकल्या केसावरून
नजर काही हटत नाही।
गुरूजी आणि सरांमध्ये
फार मोठा फरक आहे।
गुरूजी घालतात गांधी टोपी
तर सरांच्या अंगात जिन्स पँन्ट आहे।
बाईजी आणि मँडम मध्ये
फार मोठी तफावत आहे।
बाईजीचा गणवेश साधा
तर मँडमचा माँडेलसारखा आहे।
गुरूजींना वर्गातील मुलं
त्यांची मुलं वाटायची।
त्यांच्या हितामध्येच
त्यांचे समाधान असायचं।
आजचे सर जी तर मुलींना
'दिल की धड़कन' मध्ये बसवतात।
नऊ महिन्याच्या अगोदरच
जो बाला जो जो रे जो म्हणतात।
शिक्षणातील मोह-यांची बघा
नैतिकता किती ढासळलेली आहे।
पाश्चात्य संस्कृतीने बघा
'शिक्षणगंगा' कशी दुषीत झाली आहे।
-महेश हातझाडे
No comments:
Post a Comment